तपास यंत्रणांची चमकोगिरी; अन् नेत्यांचे आरोप धोक्याचे

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे.
ad ujjwal nikam
ad ujjwal nikamsakal

सांगली - राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. चमकोगिरी म्हणून वाटेल ती निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी त्याचवेळी राजकीय नेत्यांनी तपास सुरु असताना यंत्रणांवर आरोप-आक्षेप नोंदवणे कायदा सुव्यवस्थेसाठी धोक्याचे आहे अशा शब्दात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आज व्यक्त केले. राज्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आर्यन खान प्रकरणी सुरु असलेल्या एकूण गोंधळावर त्यांनी आज परखड भाष्य केले.

ते म्हणाले,‘‘ राज्य किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणांबाबत अनेक मते व्यक्त करण्यात येत आहे. ही या देशातील कायदा व्यवस्थेसाठी वाईट आहे. अर्थात तपास यंत्रणांनी एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना संयम बाळगला पाहिजे. उगीच चमकोगिरी म्हणून वट्टेल तशी निवेदने तसचे सोशल मिडियातून प्रसिध्दी टाळायला हवी. जेणेकरून तुमच्या कृत्यामुळे राजकीय नेते तुमच्यावर टिका करायला उद्युक्त होणार नाहीत. याची देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणांबद्दल प्रश्‍न चिन्ह उपस्थित करीत गेले. आणि तोही तपास सुरु असताना तर तो कायदा सुव्यवस्थेला मोठा धोका आहे. तर राजकीय व्यवस्थेला वाटत असेल तर तपास चुकीचा आहे, गैर आहे तर त्यासाठी न्यायालय आहे. परंतु केवळ प्रसार माध्यमांकडे शंका उपस्थित करून तपास यंत्रणेच्या गुणवत्तेबद्दल, विश्‍वासार्हतेबद्दल शंका जनतेच्या मनात उपस्थित करणे योग्य नाही. ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com