इस्लामपुरात गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेस एक महिन्याची मुदतवाढ

मुख्याधिकारी वैभव साबळे यांचे नागरिकांना लवकर प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
Vaibhav sabale
Vaibhav sabalesakal

इस्लामपूर : शहरातील सुमारे दीड हजार गुंठे क्षेत्राची गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.सर्वसाधरण पंचवीस हजार गुंठे क्षेत्र नोंद करण्याचे उद्दिष्ट ठेवून पालिकेने या प्रक्रियेसाठी आणखी एक महिना म्हणजे ७ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले,"शहरातील सुमारे १५ हेक्टर क्षेत्राची गुंठेवारी प्रक्रिया अभियंत्यांच्या माध्यमातून आवाक्यात आली आहे. प्लॅन बनत आले आहेत. नगरपालिकेकडून त्याची पाहणी करून भुमिअभिलेखला प्रस्ताव पाठवले जातील. मोजणीचा पहिला टप्पा लवकर पूर्ण झाल्यास नागरिकांचा भुर्दंड वाचणार आहे.अभियंत्यांकडून दुरुस्ती आराखडा घेऊन गुंठेवारी निर्मिती करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

प्लॉट विक्री,त्यावरील कर्ज प्रकरणे यासह पालिकेच्या मूलभूत सोयीसुविधा यासाठी ही प्रक्रिया नागरिकांनी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची गरज आहे. यापूर्वीची गुंठेवारी अटी-शर्ती घालून दिली जात असे; परंतु आपल्या प्रक्रियेतून कायदेशीर आणि अंतिम परिपूर्ण मंजुरी मिळणार आहे. जे नागरिक प्रस्ताव देणार नाहीत, अशांना मूळच्या रकमेच्या पाचपट दंड आणि रोज शंभर रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. हरकती सूचना मागवून प्लॅन अंतिम केला जाईल.संपूर्ण गटाची मोजणी पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. ज्यांची प्रक्रिया पूर्ण होणार नाही अशांची मालमत्ता अनधिकृत मानली जाईल. ज्या नागरिकांनी अद्याप फॉर्म नेलेले नाहीत अथवा देऊनही प्रस्ताव सादर केले नाहीत त्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

पालिकेच्या पुढाकाराने शहरातील २२ अभियंत्यांना अधिकृत नेमणूक देण्यात आली आहे. हे शहरात कोणत्याही भागात सुविधा पुरवू शकतात. मे अखेरपर्यंत किमान ५० टक्के जागेची मोजणी पूर्ण होऊन जाईल. मोजणी प्रक्रियेत विलंब होत असल्याने प्रस्ताव दाखल होण्यात दिरंगाई होते. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या जागेची मोजणी करून घेण्याची जबाबदारी आहे. केवळ सातबारा उताऱ्यावर नाव आहे म्हणून मी परवानगी देऊ शकत नाही. शहराच्या एकूणच विकासाच्या आणि वाढीच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी गांभीर्याने या प्रक्रियेत लक्ष घालावे."

भूमी अभिलेख विभागाच्या अंदाजानुसार शहरात सुमारे ७५ हजार गुंठे क्षेत्र नोंदणीअभावी आहे; मात्र नगरपालिकेच्या अंदाजानुसार २५ हजार गुंठे क्षेत्र प्राधान्याने लक्ष्य करण्यात आले आहे.१० हजार गुंठे नोंदणी प्रक्रियेत आले आहेत आणि १५ हजार गुंठे क्षेत्रासाठी पालिकेने महिन्याची मुदतवाढ दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com