कोल्हापूर - शेतमाल तारण योजनेत अखेर गुळाचा समावेश झाला आहे. यंदाच्या हंगामात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ज्या भागात गुळाचे उत्पादन होते. त्या भागात पणन मंडळाच्या वतीने बाजार समित्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
येत्या हंगामापासूनच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा. यासाठी पणनमंडळ प्रयत्नशील आहे. ही योजना राबविण्यास बाजार समित्यांनी टाळाटाळ केल्यास जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून संबंधित बाजार समित्यांच्यावर पणन मंडळ कारवाई करणार आहे.
शेतमाल तारण योजना शासनाने जाहीर केली. परंतु त्यामध्ये गुळाचा समावेश नसल्याने याचा कोणताही फायदा राज्यातील गूळ उत्पादकांना होत नव्हता. गूळ हा प्रक्रियायुक्त शेतमालाच्या वर्गात मोडत असल्याने पहिल्या टप्प्यात शासनाने या योजनेतून गुळाला वगळले. निकषात बसत नसले तरी गूळ उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या फारसा सक्षम नसल्याने या योजनेत गुळाचा समावेश करावा, अशी मागणी होत होती. याचा विचार करून पणन मंडळाने हा विषय संचालक मंडळ सभेत घेऊन याबाबत चर्चा करून प्रायोगिक तत्त्वावर गुळाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
या योजनेचा तातडीने लाभ होण्यासाठी पणन मंडळाने यंदापासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ज्या भागात गुळाची खरेदी विक्री होते. त्या बाजार समित्यांना याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. १५ डिसेंबरपूर्वी बाजारसमित्यांनी याबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तारण योजनेत जास्तीत जास्त गूळ उत्पादकांनी भाग घ्यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. बाजार समित्यांनाही सूचना दिल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील बाजार समित्यांनी यात सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही तातडीने बैठकांचे आयोजन करीत आहोत.
- सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर विभाग
तारणासाठी अटी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.