महाराष्ट्रास पाणी देण्याचे येडियुरप्पा यांचे आश्वासन

महाराष्ट्रास पाणी देण्याचे येडियुरप्पा यांचे आश्वासन

जत - कर्नाटक सीमा भागात तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी आले आहे. यातून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागात पाणी देण्यासाठी काही शिष्ठमंडळांनी आपल्याकडे पाठपुरावा केला आहे. या दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून पाणी देऊ, असे आश्वासन कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिले.  

भाजप, शिवसेना, रिपाई व रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ संख येथे सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार विजयगौडा पाटील, आमदार विलासराव जगताप, रिपाई जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, रासप जिल्हाध्यक्ष मारूती सरगर, आर. के पाटील, सभापती सुशीला तावशी, आप्पासाहेब नामद, सरदार पाटील, अॅड.चन्नाप्पा होर्तिकर, अजित पाटील आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री येडीयुरप्पा म्हणाले, जात, धर्म, पंथ याला बळी पडू नका. देशात, दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. येणाऱ्या काळात ही भाजपचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com