काेल्हापूरातील शिरोळचा कोबी खातोय भाव

 Kolhapur food Cabbage Prices Increase :
Kolhapur food Cabbage Prices Increase :

जयसिंगपूर (काेल्हापूर)  : कांद्याच्या दरवाढीमुळे शिरोळ तालुक्‍यातील कोबीनेही भाव खाण्यास सुरवात केली आहे. कांद्याला पर्याय ठरणाऱ्या कोबीला आजवरचा उच्चांकी दर मिळत आहे. सध्या कोबीचा दहा किलोचा दर 160 रुपयांपर्यंत गेल्याने कोबी उत्पादक कधी नव्हे तो चार पैसे मिळवू लागला आहे.

अद्यापही कांदा शंभरीत असल्याने तालुक्‍यातील कोबीची निर्यात थांबली असून तालुक्‍याअंतर्गत बाजारपेठेतच कोबीला मागणी वाढली आहे. उपाहारगृहांसह खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील खाद्यपदार्थांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, कांद्याच्या दरवाढीमुळे कोबीकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कांद्यावर निर्बंध घातले आहेत.

कोबीची बाजारातील मागणी वाढली

हॉटेलमध्ये कांद्याची जागा आता कोबीने घेतल्याने कोबीची बाजारातील मागणी वाढली आहे. त्यामुळे तालुक्‍याबाहेर जाणारा कोबी सध्या तालुक्‍यांतर्गत बाजारपेठेत विक्री होऊ लागला आहे. तालुक्‍यातील भाजीपाला संस्थाही कोबीशिवाय इतर भाजीपाल्याची निर्यात करू लागले आहेत. 

महापूरातून वाचलेल्या कोबीला चांगले दिवस


महापूर आणि अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील बहुतांश भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे; मात्र यातून वाचलेल्या कोबीचे क्षेत्रही फारच कमी आहे. कांद्याची दरवाढ, कोबीला वाढती मागणी या बाबी कोबी उत्पादकांच्या पथ्यावर पडल्या आहेत.

तालुक्‍यात 50 ते 60 एकरांत कोबी
नेहमीच नुकसानीत नेणाऱ्या कोबीला चांगली मागणी होऊ लागल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. खते, औषधांचा वाढता खर्च लक्षात घेता आजवर कोबीचे क्षेत्रही कमी प्रमाणात होते. कोबीच्या तुलनेत फ्लॉवरचे क्षेत्र तालुक्‍यात अधिक आहे. दरवाढीमुळे सध्या कोबीलाही चांगला भाव आला आहे. तालुक्‍यातील जवळपास 50 ते 60 एकरांत कोबीचे उत्पादन घेतले जात आहे.

हेहि वाचा - शिवाराला पार
खी झाली फुलपाखरं, पण कशामुळे ? 

उत्पादकांना चांगले दिवस

येत्या पंधरा दिवसांत नव्याने कोबी बाजारात येणार आहे. त्यावेळी मात्र आवकच्या प्रमाणात दराचे चित्र अवलंबून असले तरी कांद्याच्या दरातही होणारी घट लक्षात घेता आणखी पंधरा दिवस तरी कोबी उत्पादकांची चांदी होणार आहे

निर्यातीवरील निर्बंध


महापूर आणि अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील भाजीपाल्याचे जवळपास 65 ते 70 टक्के नुकसान झाले आहे. पूरक्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील भाजीपाला अतिवृष्टीने गेला. उर्वरित क्षेत्रातील भाजीपाल्याला चांगला भाव मिळू लागला आहे; मात्र कांद्याची दरवाढ कोबीच्या पथ्यावर पडली असून सध्या कोबीची निर्यात बंद असल्याने वाहतुकीच्या खर्चात बचत झाल्याने शिवाय आजवरच्या इतिहासातील उच्चांकी दर मिळत असल्याने कोबी शेती फायद्यात आली आहे.

 
कोबीला मागणी जास्त पुरवठा कमी

तालुक्‍यात 50 ते 60 एकर कोबी क्षेत्र आहे. महापुराने नुकसान झाल्यामुळे क्षेत्रात घट झाली आहे. सध्या तालुक्‍यातील कोबी तालुक्‍यातील बाजारपेठेतच विकला जात असल्याने तालुक्‍याबाहेर मागणी असूनही पुरवठा करणे शक्‍य नाही. तालुक्‍यातील बाजारात मिळणारा चांगला भाव, वाहतूक खर्चाची बचत या बाबींमुळे सध्या कोबीला प्रतिदहा किलोला 160 रुपये भाव मिळू लागला आहे. 

- उदय आलमाने, महालक्ष्मी फ्लॉवर भाजीपाला संघ, दानोळी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com