सरकारने शब्दांचा खेळ थांबवला नाही तर आवाज उठवू- अजित पवार

सरकारने शब्दांचा खेळ थांबवला नाही तर आवाज उठवू- अजित पवार

कोल्हापूर : "कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार शब्दांचा खेळ करत आहे. त्यांनी हा खेळ थांबवला नाही तर येत्या अधिवेशनात आवाज उठवू," असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

"एखादा मुद्दा अंगलट आला तर सरकार सोयीचा निर्णय घेत आहे.. जशी नवीन माहिती समोर येत आहे तसं सरकार GR बदलत आहे...," अशी टीका पवार यांनी फडणवीस सरकारवर केली.

येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना सतत कर्जमाफी मिळावी या मताचा मी नाही. पण, शेतकरी नैसर्गिक संकटात असला तर त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. संघर्ष यात्रा काढली म्हणूनच कर्जमाफी मिळाली असं नाही. तर शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली."

सुनील तटकरे म्हणाले, "मी आणि अजितदादा गेल्या १८ जूनपासून संघटनात्मक बांधणीसाठी बाहेर पडलो आहे. संघटनात्मक बांधणीसाठी या पूर्वी वेळ मिळाला नव्हता.  नेतृत्वाची दुसरी फळी तयार करण्याचं धोरण ठरवलं आहे. दुसरी फळी २८ ते ३२ वयोगटातील तयार करत आहोत.

GST करप्रणालीची अंमलबजावणी करत असताना त्यामध्ये सुटसुटीतपणा आणण्याची गरज आहे. LBT रद्द केल्यामुळे महाराष्ट्राचं ४० हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे."

निवडणुकीला तयार रहा
"शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं सध्या तरी वाटत नाही. तरीदेखील मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला तयार व्हा. एखाद्या पक्षाला सत्ता मिळाली नाही तर; त्या पक्षाचा जनाधार कमी झालाय असं नाही," असे तटकरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com