उत्सवात आले सरींना उधाण 

उत्सवात आले सरींना उधाण 

कोल्हापूर - जिल्ह्यात 25 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कालपासून कधी मुसळधार, तर कधी अल्पप्रमाणात हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आजही दिवसभरात पावसाने काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावून पावसाअभावी व पाण्याअभावी माना टाकलेल्या पिकांना तग धरण्यास मदत केली. 

जिल्ह्यात हातकणंगले 1.12, शिरोळ 3.57, पन्हाळा 4.42, शाहूवाडी 7.67, राधानगरी 9.33, गगनबावडा 27.50, करवीर 9, कागल 0.85, गडहिंग्लज 1.14, भुदरगड 10, आजरा 11.75 व चंदगडमध्ये 4.17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून आजअखेर जिल्ह्यात 10 हजार 348 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात राधानगरी धरणात 8.361 टीएमसीपैकी 8.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण समाधानकारक भरले आहे. तुळशी धरणातील एकूण 3.471 टीएमसी पैकी 3.46 टीएमसी धरण भरले आहे. वारणा 34.399 पैकी 33.13 टीएमसी भरले आहे. दूधगंगा 25.393 पैकी 22.51 टीएमसी भरले असून कुंभी, कासारी, कडवीही समाधानकारक भरले आहेत. राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 12 फूट 6 इंच आहे. तेरवाड 35 फूट 6 इंच, शिरोळ 27 फूट 9 इंच, नृसिंहवाडी 23 फूट 6 इंच पाणीपातळी आहे. 

नद्यांची पातळी वाढत आहे 
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे, पंचवीस दिवसांहून अधिक काळ उघडीप दिल्याने पिकांना फटका बसत होता. या पार्श्‍वभूमीवर नदीकाठी असणाऱ्या अनेकांनी वीजपंप बसविले होते, ते नव्याने काढून घेतले जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com