कोल्हापूर - दरवर्षी दहावीच्या निकालाचा आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा आलेख उंचावत असला, तरी राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षणातून मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ६६ टक्के विद्यार्थ्यांना गणितात ३५ टक्केही गुण मिळवता आलेले नाहीत. सामाजिक शास्त्रांपासून ते विज्ञान विषयातही विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावल्याचे दिसते.
मंडळाच्या किंवा शाळेच्या परीक्षांच्या ठराविक चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली आहेत का हे पाहण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) देशभर विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. यामध्ये तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची व शाळेची निवड केली. या विद्यार्थ्यांचा राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल घवघवीत लागला असला, तरी चाचणीचे निष्कर्ष मात्र निकालाच्या विरुद्ध दिसत आहेत. या गुणवत्ता सर्वेक्षणात राज्यांचे जिल्हानिहाय निष्कर्ष जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा पहिल्या पाचमध्ये आहे; मात्र शैक्षणिक गुणवत्ता चिंताजनक आहे. राज्याची राजधानी मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे.
दहावी निकालाची आकडेवारी उल्लेखनीय आहे; मात्र जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती चिंताजनक आहे.
-डॉ. आय. सी. शेख,
प्राचार्य, डाएट कॉलेज, कोल्हापूर
राज्याचे चित्र
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.