सेनेचे मंत्री आज मुंबईत जमणार असून उद्या एकत्र येण्याचे नियोजन केले जाणार आहे.
सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतही नाट्यमय राजकीय घडामोडी घडणार का असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतं आहे. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतही भाजपच बाजी मारणार असा दावा भाजप नेत्यांनी केला असला तर महाविकास आघाडीनेही यासाठा कंबर कसली असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्री आज संध्याकाळीच मुंबईत एकत्र जमतील, अशी माहिती शिवसेना नेते आणि कृषीमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांना दिली आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते. सेनेचे मंत्री आज मुंबईत जमणार असून उद्या एकत्र येण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे आजच सर्व आमदार आणि नेते मुंबईत दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही यासंदर्भात विचारले असता भुसे म्हणाले, तिन्ही पक्षामध्ये कोणतीही धुसफूस नाही. विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी विजयी होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी या निवडणुकीत जपून रहावे, अशा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही कारण आतापर्यंत राज्यात केवळ दीड टक्के पेरणी झाली आहे. पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असेही ते म्हणाले आहेत. सदाभाऊ खोत यांच्या विषयी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.