Kolhapur : आला पावसाळा, शेतकऱ्यांनो जीव सांभाळा!

तुटलेल्या तारा, गंजलेल्या खांबांचा ‘शॉक’; हकनाक जातो बळी
electricity for agriculture Complaints about damaged wires and poles farmers losing their lives electric currents monsoon
electricity for agriculture Complaints about damaged wires and poles farmers losing their lives electric currents monsoonesakal

कोल्हापूर : जिल्ह्यात शेतीसाठी वीज प्रवाहित करणाऱ्यासाठी वापरलेल्या तारा आणि लोखंडी खांब कालबाह्य झाले आहेत. तारा आणि खांब खराब झाल्याच्या तक्रारी महाविरणकडे केल्या जातात; पण याची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, पावसाळ्यात अशा विजेचा करंट लागून शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.

ऊन, वारा, थंडी आणि पावसात शेतकऱ्यांना कामापासून सुटका नसते. पावसाळ्यात जनावरांसाठी चारा काढण्याचे काम सर्रास असते. जोरदार वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे शेतातच विद्युत वाहिन्या तुटून पडलेल्या असतात. बारीक आणि सहजासहजी नजरेस न येणाऱ्या या तारांमध्ये शेतात पडल्यानंतरही विद्युत प्रवाह सुरु असतो.

electricity for agriculture Complaints about damaged wires and poles farmers losing their lives electric currents monsoon
Kolhapur Crime : पाण्याच्या टाकीत बुडवून अडीच वर्षांच्या चिमुरडीला केलं ठार; नराधमाला कोल्हापुरात अटक

याची कल्पनाही त्यांना नसते आणि मशागती करताना अशाच उघड्या तारेवर पाय पडून शेतकऱ्यांना विजेचा शॉक लागल्याने जीव गमवावा लागतो, तर काही गंभीर जखमी होतात. याची तात्पुरती दखल घेऊन ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीनुसार महावितरणचे काम सुरु असते. वास्तविक शेतातील खराब झालेल्या तारा बदलण्याशिवाय आता पर्याय नाही.

electricity for agriculture Complaints about damaged wires and poles farmers losing their lives electric currents monsoon
Kolhapur : माथाडी कामगारांनी दाद मागायची कुठे?

एकीकडे शेतकऱ्यांना विविध सवलती दिल्या पाहिजेत. शेती उत्पादकता वाढली पाहिजे, अशी सरकारकडून घोषणा केली जाते. दुसरीकडे मात्र शेतात विद्युत तारेच्या माध्यमातून याच शेतकऱ्यांच्या मृत्यूचा सापळा तयार केला जात आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे शासन आणि महावितरण आता तरी डोळे उघडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

साप, विषारी किडे यांचा सामना करत शेतीचे काम करावे लागते. यातच, पावसाळ्यात शेतात तुटून पडलेल्या विजांच्या तारांचीही भीती असते. या विद्युत तारांची आणि खांबांची डागडुजी केलेली नसते. वास्तविक असे सर्व खांब बदलणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.

- बंडोपंत पाटील, शेतकरी

पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर खराब झालेल्या विजेच्या खांबाला स्पर्श होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू, जनावरांचा चारा काढण्यासाठी गेलेल्या माय-लेकरांचा शेतात तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू, अशा अनेक दुर्घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. गंजलेले, सडलेले विजेचे खांब बदलेले नाहीत, खराब झालेल्या विद्युत तारा अनेक वर्षांपासून बदलेल्या नाहीत.

परिणामी, पावसाळ्यात अशा खांबामध्ये वीज प्रवाहित होते किंवा खराब तारा वाऱ्याने शेतात पडतात. यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आणि महावितरणने शेतातील असे विद्युत खांब आणि तारा बदलण्याची तसदी घेतली पाहिजे. याच समस्येवर प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका आजपासून...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com