kolhapur Flood : पात्र पूरग्रस्तांची रक्कम अपात्र व्यक्तीला

करवीर तहसील कार्यालयाचा सावळा गोंधळ; अनेक लाभार्थी सानुग्रह अनुदानापासून वंचित
kolhapur Flood
kolhapur Floodsakal media

कोल्हापूर : दुकानाला महापालिकेचा परवाना नाही, पंचनामे नाहीत, ग्रामपंचायतींकडून दिलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत तुमचे नाव नाही, अशी एक ना अनेक कारणे सांगत पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान नाकारले जात आहे; तर दुसरीकडे पात्र पूरग्रस्तांची रक्कम अपात्र व्यक्तीच्या नावावर वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार करवीर तहसील कार्यालयाकडून झाल्याचे निदर्शनास आले आहे.

kolhapur Flood
प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

जिल्ह्यात महापुरामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले. हजारो कुटुंबांच्या घरात पाणी शिरले. या पार्श्‍वभूमीवर त्या कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. त्याची अंमलबजावणी करताना नियम आणि अटींचे तंतोतंत पालन करीत असल्याचे दाखविले जात होते. यात अनेक पात्र लाभार्थी यापासून आजही वंचित राहिले आहेत.

ते ज्या-त्या तहसील कार्यालयात खेटे घालत आहेत. दरम्यान, पात्र लाभार्थ्यांचे सानुग्रह अनुदान अपात्र व्यक्तींच्या नावावर पाठविण्याचा भोंगळ कारभार करवीर तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याने केला आहे. याची माहिती घेण्यास गेलेल्या संबंधित लाभार्थ्याला महापालिकेत जाऊन याची चौकशी करा, अशी उत्तरे दिली जातात. संबंधित पात्र लाभार्थी हा करवीर तालुक्‍यातील एका गावातील आणि अपात्र लाभार्थीही खेडेगावातीलच आहे. यात महापालिकेचा काय संबंध काय, हाच प्रश्‍न आहे. दरम्यान, मूळ लाभार्थ्यानेच आपली रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वर्ग झाल्याचे लक्षात आणून दिल्यावर करवीर तहसील कार्यालयाकडून संबंधित बॅंकेला पत्र लिहून ती रक्कम परत मूळ लाभार्थ्याच्या नावावर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ज्या अपात्र लाभार्थ्याच्या नावावर ही रक्कम आहे, तो ही रक्कम देण्यास नकार देत आहे. त्यामुळे, मूळ लाभार्थ्याला त्याच्या हक्काची रक्कम परत मिळवून देणार कोण, हाच मोठा गोंधळाचा विषय झाला आहे. एकीकडे ज्यांच्या घरात पाणी शिरले, त्यांना अनुदान मिळाले नाही म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावातून तक्रार येत आहे. त्याची खातरजमा केली जात असेल. पण, जो पात्र पूरग्रस्त आहे, त्याची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर पाठविणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

kolhapur Flood
सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

पूरग्रस्त बेदखल

करवीर तहसील कार्यालयात पूरग्रस्तांना ऑनलाईन निधी वाटप करणारे कर्मचारी पूरग्रस्तांबरोबर सौजन्याने वागत नाहीत. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करीत असल्याने हे कर्मचारी मूळ लाभार्थ्याचे पैसे इतरांच्या खात्यावर गेल्याचे सांगूनही त्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांची दखल घेतली जात नाही.

"माझ्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे मला सानुग्रह अनुदान मंजूर झाले. पण, ते माझ्या खात्यावर न पाठविता इतरांच्या नावावर वर्ग केले आहे. करवीर तहसीलमध्ये हे मी स्वत: त्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानंतर त्यांनी पत्र दिले व ती रक्कम माझ्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. पण, वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम माझ्या खात्यावर वर्ग झालेली नाही."

- अशोक गुरव, पूरग्रस्त मूळ लाभार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com