चिक्कोडी : सहा महिन्यात चिक्कोडीसह परिसरात महापूर, अतिवृष्टीचा फटका बसला आहे. विभागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठासह भागातील शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला. कापणीस आलेली खरीप पिके महापुराने घेऊन गेली. घरे जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. त्याची भरपाई कशी होणार? याची चिंता लागून राहिली आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. मात्र ती भरपाई अद्यापही पूर्णपणे मिळालेली नाही. ते नुकसानग्रस्त शेतकरी आता दुबार शेती कामे करण्याकडे वळले आहेत. प्रत्येक वर्षी नुकसानीचा फटका सहन करत जगणाऱ्या बळीराजाला शासन कधी आधार देणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.
चिक्कोडी भागातील वेदगंगा, दुधगंगा व कृष्णा नदीकाठचा भाग पूर्णपणे जलमय झाला होता. सरकारकडून पाहणी करून सर्व्हे झाल्यानंतर मदत मिळेल अशी अपेक्षा पूरग्रस्तांतून व्यक्त होत होती. ज्या शेतकऱ्यांचे पुराच्या पाण्याने नुकसान झालेले नाही, अशा शेतकऱ्यांचे उत्पादन आता कवडीमोल दराने विकले जात आहे. अशा शेतकऱ्यांना शासन भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या भागाच्या विकासकामांचा दौरा केला आहे. त्यांनी नदीकाठ भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी होत होती.
मात्र त्याविषयी कोणतीही उपाययोजना शासन राबविणार? याकडे आता चिककोडी विभागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 'एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे प्रशासकीय संकट' झेलणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिकाच निर्माण होत चालली आहे. ती कमी करण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाय योजना राबविणार का? याकडे बळी राजाचे लक्ष लागून राहिले आहे.
'अतिवृष्टी, महापुरामुळे हातात आलेली पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून गेलेल्या खराब पिके काढून दुबार पेरणी करण्यास पुन्हा रक्कम मोजावी लागत आहे.`
-धनाजी पाटील, शेतकरी, मलिकवाड.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.