कोल्हापूर : चला पंचगंगा घाटावर;स्वच्छता मोहीम

इचलकरंजी येथील घाटावर जलदिंडीचा सांगता समारंभ
पंचगंगा
पंचगंगा sakal

कोल्हापूर: ‘पुन्हा साथ देऊया, चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत आजपासून सुरू झालेल्या राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचे नदी काठावरील गावांनी जोरदार स्वागत केले. स्वच्छतेबरोबरच पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आवश्यक ठोस उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त झाला. उद्या (शुक्रवारी) सकाळी साडेसातला शहरातील पंचगंगा घाटावर जलदिंडीचे स्वागत होणार आहे. यावेळी पंचगंगा घाटाची स्वच्छता मोहीम होणार असून जल संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. शहर आणि परिसरातील विविध संस्था, तालमी, संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांचा या मोहिमेत सहभाग राहणार आहे.

पंचगंगा घाटावरील मुख्य सोहळ्यानंतर जलदिंडी राजाराम बंधारामार्गे इचलकरंजीकडे रवाना होईल. सायंकाळी साडेचारला इचलकरंजी येथे मोहिमेची सांगता होईल. चला, तर मग सारे मिळून मोहिमेत सहभागी होऊया, पंचगंगा प्रदूषणमुक्त करूया...!

शोषखड्डा नाही; तर बांधकाम परवाना नाही

पाडळी खुर्द, शिंगणापूर ग्रामपंचायतींचे प्रदुषणमुक्तीसाठी विधायक पाऊल

कुडित्रे पाडळी खुर्द आणि शिंगणापूर ग्रामपंचायतीने आज दुसरे विधायक पाऊल टाकले. शोषखड्डा नाही, तर ना हरकत दाखला नाही, आधी शोषखड्डा; नंतर घर, असा निर्णय जाहीर केला. दै. ‘सकाळ’तर्फे आज पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जलदिंडी सुरू झाली. शिंगणापूर येथे सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडितराव, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी या दोन ग्रामपंचायतींच्या उपक्रमांचे कौतुक केले.

पाडळी खुर्द गावाने आपल्यापासून सुरुवात म्हणून शोषखड्डे करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. आता शोषखड्डा नाही, तर ना हरकत दाखला नाही, आधी शोषखड्डा, नंतर घर बांधावे, असा निर्णय सरपंच तानाजी पालकर व सदस्यांनी घेऊन पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दुसरे पाऊल टाकले आहे. या निर्णयात सहभागी होत शिंगणापूर ग्रामपंचायतीनेही शोषखड्डा नाही, तर ना हरकत दाखला नाही, असा निर्णय घेतल्याचे सरपंच प्रकाश रोटे यांनी जाहीर केले. पाडळी खुर्द येथे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी, असा निर्धार करत तेरा सदस्यांनी घराचे सांडपाणी गटारीला न सोडता शोषखड्डे करण्याचा निर्णय घेतला होता.यांचाही सहभाग

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस प्रशासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ.

पोलिस बॅंडचा थाट

पंचगंगा घाटावर होणाऱ्या जलदिंडी स्वागतावेळी पोलिस बॅंडचा अनोखा थाट अनुभवायला मिळणार आहे. जल संवर्धनावर आधारित विविध गीते बॅंडच्या माध्यमातून सादर केली जाणार आहेत. सायबर महिला व सायबर एमएसडब्ल्यू कॉलेजचे विद्यार्थी पथनाट्ये सादर करणार असून शाहीर रंगराव पाटील पोवाडा सादर करतील.

कोल्हापूर तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ’च्या पुढाकाराने राबविल्या जाणाऱ्या ‘पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत गुरुवार (ता. २१)पासून राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीला उत्साहात प्रारंभ झाला.

गावोगावी जलदिंडीचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. पिरळ (ता. राधानगरी) येथील उगमापासून सुरू झालेली जलदिंडी सायंकाळी शिंगणापूर (ता. करवीर) येथील घाटावर पोचली. शुक्रवारी (ता. २२) सकाळी शहरातील पंचगंगा घाटावर जलदिंडीचे स्वागत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com