

Kolhapur : ‘टक्केवारीसाठीच आमदार राजेश क्षीरसागर शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देत आहेत. त्यांनी शहराचा विकास बाजूला ठेवून संबंध नसलेल्या महामार्गाची बाजू घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नये’, असा हल्लाबोल आज इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर महापुराच्या जनजागृतीसाठी शहराच्या ३२ प्रभागांचा जनजागृती मेळावा घेण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.