मागास आयोगात मराठा प्रतिनिधीच नाही; समरजितसिंह घाटगेंची नाराजगी

सरकारने तातडीने आयोगामध्ये मराठा समाजातील प्रतिनिधीची नियुक्ती करावी
मागास आयोगात मराठा प्रतिनिधीच नाही; समरजितसिंह घाटगेंची नाराजगी

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्य मागास आयोग नेमला. मात्र या आयोगात मराठा समाजाचा एकही प्रतिनिधी नाही. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. अशी खंत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केली. सरकारने तातडीने आयोगामध्ये मराठा समाजातील प्रतिनिधीची नियुक्ती करावी. अन्यथा हे सरकार शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराने चालणारे आहे असे म्हणता येणार नाही. असेही घाटगे यांनी सांगितले.

आपली भूमिका स्पष्ट करणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडीयावरून प्रसिद्ध केला आहे.

समरजितसिंह घाटगे यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रोबधन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दरम्यान त्यांनी कुरुंदवाड येथील मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारने नेमलेला मागास आयोग म्हणजे मराठा आरक्षणाच्या मृत्यूची तारीखच आहे. असे विधान केले होते.

आज पुन्हा त्यांनी आयोगाबद्दल आपली नाराजगी व्यक्त केली आहे. समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालते असे सांगितले जाते. मात्र सरकारने नेमलेला राज्य मागास आयोग सर्वसमावेशक नाही. ज्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, त्या मराठा समाजातील एकही प्रतिनिधी राज्य मागास आयोगात नाही. त्यामुळे मराठा समाजाची निराशा झाली असून आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

राज्य मागास आयोग सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजातील प्रतिनिधीची निवड केली नाही तर हे सरकार शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालते असे म्हणता येणार नाही.‘ अशी भावना समरजितसिंह घाडगे यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com