कोल्हापूर : ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून (maharashtra) अनेकजण रायगडावर (raigad) हजेरी लावतात. यासाठी खासदार संभाजाराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावरुन आवाहन केले आहे. यात त्यांनी, शिवराज्याभिषेक महोत्सव (shivrajyabhishek) समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारोंनी व्यक्त केलीय. त्याप्रमाणे इच्छुकांना काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यांनी फेसबुक अकाऊंटवर एक लिंक देखील उपलब्ध करुन दिलीय, त्यानुसार माहिती भरण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
संभाजाराजे पुढे म्हणतात, हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली आहे. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले आहे. किल्ले रायगडावर शिवरायांनी राज्याभिषेकाच्या प्राचीन प्रथेला पुनर्जिवित करून ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करवून घेतला. एक सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
शिवराज्याभिषेकानंतरच ‘स्वराज्यास’ एक तात्त्विक बैठक मिळून शिवरायांनी चालविलेले उद्योग हे केवळ ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना केली आहे, हे या राज्याभिषेकाने सिध्द केले. त्यावेळच्या तरूणांना शिवरायांनी एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्याच ध्येय उद्देश्याने शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्य करत आहे. समिती सोबत जोडून कार्य करण्यासाठी लिंकवर संपूर्ण माहिती भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
(https://docs.google.com/.../1FAIpQLSeU9fLmxPm.../viewform)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.