सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही तर राज्यभर आंदोलन : शेट्टींचा इशारा

आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती श्री शेट्टी यांनी यावेळी दिली.
raju shetti
raju shettisakal

कोल्हापूर: शेतीला दिवसा वीज देण्याबाबत आयआयटी तज्ञांकडून येत्या पंधरा दिवसात अभ्यास करून अहवाल मागवला जाईल, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी रास्त असल्याचे दिसल्यास योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन ऊर्जामंत्री दिले आहे, त्यामुळे पंधरा दिवस आम्ही शासनाच्या निर्णयाची वाट पाहू मात्र शासनाने दिलेला शब्द जर पाळला नाही तर त्यानंतर राज्यभरात आंदोलनाचा डोंब उसळेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.

गेल्या पंधरा दिवसापासून ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती श्री शेट्टी यांनी यावेळी दिली.या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर काल मुंबईमध्ये ऊर्जामंत्री यांच्यासोबत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची चर्चा झाली या चर्चेत अनेक मुद्दे होते, त्यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शवली त्याचे तपशील आज आंदोलनस्थळी श्री शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संपर्क जाहीर केले ‌

राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिले अनेक ठिकाणी सदोष आली आहेत, मृतांच्या नावावरही थकबाकीचा बिल मारले जात आहे. वीज ग्राहकांची वीज तोडली जात आहे, याविषयी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत त्यावर उर्जा मंत्र्यांनी अशीच सदोष बिले तातडीने दुरुस्त करण्यासाठी तालुकावार शिबिरे घेण्यात येतील. त्यात ही बिले दुरुस्त करून देऊ असे आश्वासन दिले आहे.

थकीत वीज बिले भरण्यासाठी सवलत देण्याची योजना येत्या 31 मार्च पर्यंत आहे त्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणीही श्री शेट्टी यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली. शेतकऱ्यांच्या उसाला सध्या तोड आलेली आहे ऊस कारखान्याला गेल्यानंतर काही काळाने पहिले बिल मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या कडे आत्ता पैसे नाहीत अशात ही योजना जर संपली तर शेतकऱ्यांना सवलत मिळणार नाही त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी असा मुद्दाही शेट्टी यांनी उपस्थित केला. त्यालाही ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

दिवसा शेतीला वीज पुरवठा व्हावा या मागणीसंदर्भात गेली पंधरा दिवस झालेली उपोषण, त्यानंतर ऊर्जामंत्री यांच्याशी झालेली चर्चा त्यांनी दिलेली आश्वासने याची माहिती राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना जागृत केले जाईल व पंधरा दिवसाने शासनाने दिवसा वीज देण्यासंदर्भात निर्णय न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा बी प्लॅन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बनवला आहे अशी माहितीही या वेळी शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com