तुळशी जलाशयावरील बागेला अवकळा

तुळशी जलाशयावरील बागेला अवकळा

00904

तुळशी धरणक्षेत्रातील बागेला अवकळा
निधीअभावी दुरवस्था; खेळणी, कारंजा केवळ आठवणीच

धामोड, ता. १५ : दहा वर्षं पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या तुळशी जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या बागेला अवकळा आली आहे. लहान मुलांसाठी असलेली खेळणी, नयन्यरम्य कारंजा केवळ आठवणी ठरत आहेत. शासनाच्या उदासीनतेमुळे समस्येच्या ग्रहणात सापडलेल्या बागेला गतवैभव मिळणार का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
१९७८ मध्ये तुळशी धरण बांधले गेले. त्यावेळी तत्कालीन डी. डी. शिंदे सरकार यांच्या संकल्पनेतून तीन एकर जागेत नयनरम्य बाग तयार झाली. बागेच्या मध्यभागी हनुमान मंदिर आहे. अल्पावधीतच बाग पसंतीस पडल्याने येथे पर्यटकांची रेलचेल वाढली. बागेमध्ये नावीन्यपूर्ण मुलांसाठी खेळणी, घसरगुंडी, झोपाळे आणि मंदिरासमोर सुंदर नयनरम्य कारंजा उभारण्यात आला. मात्र, पाच ते सहा वर्षांपासून बागेला अवकळा आली आहे. आठ वर्षांपासून शासनाने निधी दिला नसल्याने समस्यांच्या गर्तेत बाग आहे. त्यातच कर्मचारी नसल्याच्या कारणाने प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

कोट
येथील बाग आबालवृद्धांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक समस्या येथे निर्माण झाल्या आहेत. शासनाने लक्ष देऊन बागेला गतवैभव प्राप्त करून द्यावे.
- अशोक कांबळे, नागरिक

कोट
येथील बाग पर्यटकांसाठी पर्वणी होते. शासनस्तरावर निधी व कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे बागेची दुरवस्था झाली आहे. बागेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- खंडेराव गाडे, तुळशी धरण शाखा अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com