म्हासुर्ली पैकी जोगमवाडी येथे तीव्र पाणीटंचाई

म्हासुर्ली पैकी जोगमवाडी येथे तीव्र पाणीटंचाई

00978

दिवसाला दोन घागरीच पाणी
म्हासुर्लीपैकी जोगमवाडीत चित्र; धामणीवरून योजना राबवा
धामोड, ता. ७ : जिल्ह्यात पाण्याचा तालुका अशी ओळख असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी जोगमवाडी गावात पाणीटंचाई तीव्र बनली आहे. जिवंत झरे आटल्याने महिलांना पाण्यासाठी रोज पायपीट करावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही कायमस्वरूपी येथे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली नाही. त्यामूळे महिलांना दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
म्हासुर्ली ग्रामपंचायतअंतर्गत एक हजार लोकवस्तीचे जोगमवाडी गाव आहे. या गावाला सायफन योजना कार्यान्वित असून जंगलातून जिवंत पाणी पिण्यासाठी आणले आहे. जिवंत झरे आटल्याने पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. तीस वर्षापूर्वी जंगलातून आणलेल्या पाण्याच्या साठवणुकीसाठी बांधलेल्या टाकीला गळती लागली आहे. दिवसभरात प्रत्येक कुटुंबाला दोन घागरी पिण्याचे पाणी मिळते. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना रोज पायपीट करावी लागत आहे. एकीकडे जिल्ह्यात हा तालुका पाण्याचा खजिना म्हणून परिचित असतानाच तालुक्यातील जोगमवाडी ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. येथे धामणी नदीवरून कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

कोट:
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामुळे गावातील तरुण उपवर मुलांची लग्न होत नाहीत. पाण्याच्या प्रश्नामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. आमच्या प्रश्नाचे निवडणुकीत भांडवल करून मते घेतली जातात, पण प्रश्न सुटत नाहीत.
- राजू जोगम ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com