
उदगावातील कृष्णा पात्रातील भराव काढण्याची मागणी
उदगावातील कृष्णा पात्रातील भराव काढण्याची मागणी
जयसिंगपूर, ता.२० : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या पात्रात मिरज-कोल्हापूर रेल्वे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षांपासून भराव टाकला आहे. सध्या जलसंपदा विभागाकडून महापुराला अडथळा होणारे भराव काढण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना मात्र, रेल्वे पुलाच्या दुरुस्तीसाठी घातलेला भराव मात्र अद्याप काढला नाही. त्यामुळे हा भराव काढण्याची मागणी होत आहे.
उदगाव येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलासाठी तीन वर्षांपासून काँक्रीट भरून नेणारी वाहने प्रत्येक खांबापर्यंत जाण्यासाठी नदीच्या पात्रात प्रचंड मोठा भराव टाकला आहे. पंधरा दिवसांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या जलसंपदा विभागाकडून नदी पात्रातील अडथळे दूर करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. असे असताना मात्र, रेल्वे पुलाचे काम पूर्ण होऊनही कृष्णा नदी पात्रातील भराव अद्याप काढलेला नाही.
उदगाव येथे दोन वाहतुकीचे व एक रेल्वे असे एकूण तीन पूल आहेत. शिरोळ तालुक्याला महापुराचा भीषण फटका बसतो. त्यामुळे या पुलाच्या भरावाची कारणे अनेक तज्ज्ञांनी दिली आहेत. त्यामुळे रेल्वे पुलाची दुरुस्ती झाली असल्याने आता हा भराव काढून टाकण्याची मागणी होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02794 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..