
पावसाळ्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणूका
पावसाळ्यानंतर महापालिका निवडणुका
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ; यंदाचे अभ्यंगस्नान थेट पाईपच्या पाण्यानेच
कोल्हापूर, ता. ३ : कोरोनामुळे अनेक संकटे आली; पण येणाऱ्या दिवाळीत काळम्मावाडीतून येणाऱ्या थेट पाईपलाईनमधील पाण्यानेच घातली जाईल, अशी ग्वाही देत पावसाळ्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक निश्चितपणे होणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. कोल्हापूर शहर हे जागतिक नकाशावर आणण्याचा प्रयत्न पालकमंत्री सतेज पाटील आणि आपण करणार आहोत, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले. उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत विजयी जयश्री जाधव यांचा सत्कार आणि विजयी मेळाव्यानिमित्त कदमवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘कोरोनामुळे एक वर्ष काम झाले नाही. भाजपच्या सत्ताकाळात थेट पाईप लाईनसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या मिळाल्या नाहीत. टीकाकार काहीही म्हणू देत आम्ही दुप्पट वेगाने काम सुरू केले आहे. येणाऱ्या दिवाळीतील पहिली अंघोळ काळम्मावाडी धरणातून येणाऱ्या पाण्यानेच घातली जाणार आहे. कोरोनामुळे अनेक अडचणी होत्या. तरीही महाविकास आघाडीने विकास कामे केले. राज्यात ओबीसी आरक्षणासाठी महानगरपालिकेच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. दीड वर्ष झाले या निवडणूक पुढे गेल्या आहेत. आता मात्र पावसाळ्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक निश्चितपणे होणार आहे. यासाठी प्रत्येकाने शिल्लक सर्व विकास कामे तात्काळ करुन घेतली पाहिजेत.’’
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी मध्ये पन्नास-पन्नास टक्के मतदान झाले आहे. पण, महानगरपालिका निवडणूकीत हीच टक्केवारी ७५ टक्क्यांपर्यंत जाणार आहे. अशी कामे करुन दाखणार आहोत.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54854 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..