
शेतकरी संघटनेची मंगळवारी ऊस परिषद
शेतकरी संघटनेची
१७ ला ऊस परिषद
कोल्हापूर, ता. ९ : दोन साखर कारखान्यांतील व इथेनॉल प्रकल्पामधील जाचक अट रद्द करा, तुकडेबंदी कायदा रद्द करा, याशिवाय इतर मागण्यांसाठी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता.१७) दुपारी १ ते ४ या वेळेत शाहू स्मारक भवन येथे भव्य ऊस परिषद घेतली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. श्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे हाल आजही संपुष्टात नाहीत. शासनाच्या नातेवाईकांचे कल्याण व्हावे, यासाठी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर कमी केले जात नाही. शेतकऱ्यांना किंवा गोरगरीब लोकांना एक-दोन गुंठे जमिनीची विक्री करता येत नाही. तुकडे बंदीमुळे या सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे. यासाठी शासनाने हा कायदा रद्द केला पाहिजे. कोल्हापूरच्या महापुरातून शेतकऱ्यांची व त्याच्या पिकांची सुटका केली पाहिजे, यासाठी कायमस्वरूपी उपाय केले पाहिजे, या मागण्यांबद्दल या ऊस परिषदेत चर्चा केली जाणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. यावेळी, ऍड. माणिक शिंदे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56680 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..