
पान ५
२१८१६
वेळवट्टी (ता. आजरा) ः टस्कराने बांबूचे केलेले नुकसान
वेळवट्टीत टस्करांकडून
बांबूचे नुकसान
आजरा, ता. १४ ः वेळवट्टी व हाळोली परिसरात टस्कराने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. येथील चाळोबा जंगलात मुक्काम ठोकलेला टस्कर सायंकाळी शेतात उतरून पिकांची नुकसान करीत आहे. दोन दिवस त्यांने बांबू पिकाचे नुकसान केले आहे. त्याला या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे. चाळोबाच्या जंगलात मुक्कामला असलेल्या टस्कराकडून शेतातील पिक उद्ध्वस्त केली जात आहेत. टस्कर बांबूच्या पिकावर ताव मारत आहे. त्यांने शुक्रवार रात्री येथील सदानंद मांगले, अंकुश मांगले, डॉ. धनाजी राणे या शेतकऱ्यांचे बांबू पिकात धुमाकूळ घालत अनेक बांबू मोडून टाकले. कोवळे कोंब फस्त केले. नंतर तो आजरा आंबोली रस्ता ओलांडून वेळवट्टीच्या दिशेन गेला. उसाच्या शेतात उतरून त्यांने ऊस पिकाचेही नुकसान केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58210 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..