
शाहू महिलांना महिलांचे अभिवादन बातमी
23795
शाहू स्मृती शताब्दी
वर्षात महिलांची उपेक्षा
--
रंजना सानप; ‘आम्ही भारतीय महिला’तर्फे अभिवादन सभा
कोल्हपूर, ता. २२ ः ‘‘महिला सक्षमीकरणाचा जिवंत वस्तुपाठ देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायदे, नियम करून त्यांच्या उत्थानासाठी कार्य केले; मात्र त्यांच्याच स्मृती शताब्दी वर्षाच्या उपक्रमात महिलांना सहभागी करून घेतले नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत रंजना सानप यांनी व्यक्त केली. ‘आम्ही भारतीय महिला मंच’तर्फे कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता गिरी होत्या.
यावेळी सानप म्हणाल्या, ‘‘जाती-धर्माच्या पुढे जाऊन आज राजर्षी शाहूंचा कल्याणकारी वारसा जपण्याची आणि ते संस्कार पुढच्या पिढीवर करण्याची नैतिक जबाबदारी महिलांची आहे. रखमाबाई केळवकर, कृष्णाबाई केळवकर, महाराणी इंदूमती बाईसाहेब यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी तर राजर्षी शाहूंनी प्रयत्न केलेच; मात्र त्यासोबत महिला सक्षमीकरणाचा जिवंत वस्तुपाठ देणारे म्हणून राजर्षी शाहू हे ख्यातकीर्त आहेत, हे विशेष.’’
यावेळी शिवाजी विद्यापीठातून इंग्रजीतून पीएच डी. मिळवणाऱ्या डॉ. शोभा चाळके यांचा विशेष सन्मान झाला. कार्यक्रमाला प्रा. मीनल राजहंस, योगिता कोडोलीकर, प्राचार्य सुचेता भोसले, पूनम राजहंस, वैशाली कांबळे, तृप्ती राजहंस, साक्षी चोथे, अमृता नलवडे, अनुष्का माने, राधिका पाटील, मनीषा मोरे आदी उपस्थित होत्या. प्रा. मीनल राजहंस यांनी स्वागत केले. सानिका नाकील यांनी सूत्रसंचालन केले. साक्षी चोथे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60700 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..