
पान ८ कदम प्रेस
मुश्रीफांनी प्रथम आरक्षण सोडत थांबवावी
-
सुनील कदम ; डाटा दिल्यानंतर आरक्षण घेऊनच पुन्हा सोडत घ्यावी
कोल्हापूर, ता. २४ ः ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकार हतबल असून कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे जूनच्या पहिल्या आठवड्यात डाटा सादर करणार असल्याचे वक्तव्य करतात,
त्यांनी भूलथापा मारून ओबीसींच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम थांबवून ३१ मे रोजी होणारी महापालिकेची आरक्षण सोडत प्रथम थांबवावी. डाटा सादर करून ओबीसी आरक्षण घेऊनच नंतर ही सोडत घ्यावी,’’ असे माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री. कदम म्हणाले, ‘‘आरक्षण सोडत घोषित झाल्यानंतर डाटा न्यायालयात सादर केला तरी त्यानंतर निकाल दिल्यानंतर तो पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी लागू होणार आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत ओबीसी वंचित राहणार आहेत. ओबीसींचे नेते असलेले मंत्री छगन भुजबळ काही वक्तव्य करत नाहीत. मुश्रीफांचे वक्तव्य संशयास्पद आहे. ३१ मे रोजीची महापालिकेची सोडत झाल्यास पुढील प्रक्रिया थांबणे अशक्य होईल. सरकारने ही सोडतच थांबवावी. तसेच डाटाचा अभ्यास करावा. मंत्री मुश्रीफांनी येथील ओबीसी नेत्यांना आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही, हे सांगावे.’’ कदम यांनी राजारामपुरीतील अतिक्रमण कारवाईला विरोध नाही. पण राजकीय आकसापोटी केलेली कारवाई चुकीची आहे. ती चुकीची नव्हती तर अतिक्रमणे पाडल्यानंतर आता नोटीस का दिल्या? असा सवाल केला. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या चुकीच्या कामावर प्रशासन कारवाई करत नाही, घरफाळा लावत नाही, असा आरोपही कदम यांनी केला. मार्केट यार्डमधील महापालिकेच्या ताब्यात असलेला रस्ता विकून त्यावर लावलेली १३ खोकी काढण्याचे धाडस करावे. महापालिका प्रशासन कोणाच्या सांगण्यावरून चालते असेच दिसते. प्रशासनाला विकत घेतल्यासारखा कारभार वाटतो. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या कारभाराबाबत आता मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याकडे दाद मागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61697 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..