
श्रीराम सोसायटी
श्रीराम विकास सोसायटीच्या
निवडणुकीतील सर्व अर्ज वैध
कसबा बावडा, ता. ३० ः येथील श्रीराम विकास सोसायटीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले. भटक्या विमुक्त गटात दत्ता मासाळ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली, तर इतर मागास, अनुसुचित जाती व महिला प्रतिनिधी गटात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. १४ जून हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून, त्याच दिवशी या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातील १२ जागांसाठी ४४, महिला प्रतिनिधी गटातील दोन जागांसाठी चार तर इतर मागास, अनुसुचित जाती प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांचे संस्थेवर वर्चस्व आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यावेळी पाटील यांनी सत्तारूढ गटातील १४ विद्यमान संचालकांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी नवे चेहरे दिले आहेत. विरोधी गटांकडून पॅनेल उभे केले जाण्याची शक्यता आहे. तथापि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ गटाचे काही संचालक विरोधी गटाच्या नेत्यांशी चर्चेत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63099 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..