
१
मत-मतांतरे
---------
महागाईचा भडका
आज आपण पाहतो, की दिवसेंदिवस सर्वच वस्तूंचे दर वाढत सर्वच क्षेत्रांत महागाईने कहर केला. तेल, गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. सर्व धान्यांच्या दरात वाढ झाली. तसेच, गॅसच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल थांबवायचे असतील तर पेट्रोल, डिझेल, गॅस व तेलाचे दर कमी केले पाहिजेत. सर्वसामान्यांना परवडेल असे दर ठेवणे जरुरीचे आहे. किमान दोन वेळचे जेवण करून माणूस सुखा-समाधानाने जगेल, एवढीच अपेक्षा.
तेजस बेदमुथा, सांगली
...तरच गरीब-श्रीमंतांची दरी कमी होऊ शकेल
कोरोना काळात काही उद्योगसमूह, उद्योगपती व व्यापाऱ्यांनी पैशांसमोर माणुसकीसारख्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून वगळल्या. काही उद्योगपती आपलं साम्राज्य उभं करताना इतर छोट्या उद्योग आणि घटकांची आर्थिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक करतात. पैसे वेळेत न देणे ही बाब तर अधोरेखित आहेच आणि त्यातून तशीच साखळी खालच्या घटकांपर्यंत जाते. त्यामुळे पैशांची बचत ही संकल्पनाच पूर्णपणे नष्ट होते. कसेबसे जीवन जगणे हेच काय ते उद्दिष्ट! वैद्यकीय व शैक्षणिक खर्च फक्त श्रीमंत लोकांना झेपतो. औद्योगिक क्रांतीनंतर वस्तू उत्पादन जोरदार सुरू झाले आहे. आता तर कमी दर्जाच्या मालाची निर्मिती करून जास्त नफा मिळविण्याचे उद्योग सुरू आहेत. आणि त्यासाठी प्रत्येक देशाचे सरकारही तेवढेच दोषी आहे. आपल्या देशात तर भ्रष्टाचार आहेच; पण कोरोना काळात काही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी सवलती असूनही गरजूंची लूट केल्याचं दिसून येतं. ‘ऑक्सफॉन’चे सर्वेक्षण व त्यातील निष्कर्ष १०० टक्के सत्य आहेत, हे नाकारता येणार नाही. प्रत्येक देशात कमी-जास्त प्रमाणात मोठ्या उद्योगपतींना कर व कर्ज सवलती आदी सुविधा मिळतातच. पण, दुसरीकडे इतरांना हे अप्रत्यक्षपणे अटींमार्फत नाकारले जातात. ‘ऑक्सफॉम’ची बड्या उद्योगांना- श्रीमंतांना कर लागू करण्याची मागणी योग्यच आहे; तरच ही गरीब-श्रीमंतांची दरी कमी होऊ शकेल.
विजय काकोडकर, कोल्हापूर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66058 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..