
जलशुद्धीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी
29014
--------------------------
जलशुद्धीकरण केंद्र
सुरू करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : पूर्वी बड्याचीवाडी हद्दीत आणि आता गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दीत शेंद्रीरोडला असणारे जलशुद्धीकरण केंद्र वापराविना बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही. हे केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पालिकेच्या प्रशासकांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
शेंद्री रोडला धनगर मंदिरसमोर जलशुद्धीकरण केंद्र आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून हे केंद्र उभारले आहे. शेंद्री रोड, लाखेनगर, मेटाचा मार्ग, माळगी वसाहत, शाहू कॉलनी, धनगर मंदिर परिसरातील नागरिकांना यामुळे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत होते. दरम्यान, शहराची हद्दवाढ झाली. हद्दवाढीनंतर हे केंद्र नगरपालिकेकडे वर्ग झाले. सध्या हे जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे. पावसाळ्याला सुरवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी हे जलशुद्धीकरण केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी निवेदन स्वीकारले. शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश ताशिलदार, गंगूबाई ताशिलदार, शोभा पोवार, मायव्वा कारदगे, पूजा तेलवेकर, रमेश इंजल, वैभव वाघराळकर, प्रेमा बडगेर, मयुरी अर्जुनवाड, विद्या कारदगे, कावेरी कारदगे, निंगाप्पा कारदगे, मिलन कुरळे, सविता ताशिलदार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67671 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..