
पाऊस
पावसाची दडी
उरात धडकी...
शेतकरी अस्वस्थ; धरणक्षेत्रातही पाऊस नाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः पावसाने आज पुन्हा एकदा दांडी मारली आहे. दोन दिवस ढगाळ हवामानानंतर पाऊस झाला होता. पावसाची ओढ लागल्यामुळे शेतकऱ्यांना घोर लागला आहे. धरणक्षेत्रासह, दुर्गम भागात सुद्धा आज पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीतील पेरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच प्रशासनाने कमी वेळेत अधिक पाऊस झाला तर काय करावे, याचेही नियोजन सुरू केले आहे.
अजून किती दिवस वाट पहायची, अशी अवस्था आता पावसाने केली आहे. संपूर्ण जून महिना संपला तरीही म्हणावा तितका पाऊस जिल्ह्यात आजपर्यंत झाला नाही. त्यामुळे शेतकरीही चिंतेत आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत आहे. १५ जुलैपर्यंत फारशी चिंता नसली तरीही पुढील पंधरा दिवसांत पाऊस कमी झाल्यास मात्र चिंता निर्माण होऊ शकते. पुढील कालावधीत कमी वेळेत अधिक पाऊस होऊ शकतो. त्या अनुषंगानेही प्रशासनाने तयारी केली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी पावणे अकरापर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार तालुकानिहाय मिलिमीटरमधील पाऊस असा - हातकणंगले ०.३, शिरोळ ०.१, पन्हाळा १.७, शाहूवाडी ४.२, राधानगरी १०.१, गगनबावडा १८.४, करवीर(कोल्हापूर) १.२, कागल १.५, गडहिंग्लज ०.६, भुदरगड ४.३, आजरा १.४, चंदगड २.७ इतका पाऊस झाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72798 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..