
किसान मोर्चा
प्रोत्साहन अनुदान
मुश्रीफांनी का दिले नाही
भाजप किसान मोर्चाचे भगवान काटे यांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः महाविकास आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ अडीच वर्षे मंत्री होते त्यांच्याच काळात शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान का मिळवून का दिले नाही, असा प्रश्न भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे असा सल्ला श्री. शिंदे व श्री. फडणवीस सरकारला श्री. मुश्रीफ यांनी कागल येथे कालच्या मेळाव्यात दिला होता. यापार्श्वभूमीवर किसान मोर्चाने त्यांना प्रतिप्रश्न केला आहे.
श्री. काटे यांनी पत्रकात म्हटले आहे, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल तसेच ज्या कर्जदारांनी नियमित कर्जफेड केली. अशांना पन्नास हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. असे अनुदान शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाही तसेच जाचक अटी घातल्या. २०१९ च्या महापूरकाळात अतिवृष्टीत ज्यांना भरपाई मिळाली अशांना अनुदान नाकारले. त्याचा विसर मुश्रीफ यांना कसा पडला आहे.
श्री. फडणवीस मुख्यमंत्री असताना अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना ९५० रुपये गुंठा भरपाई दिली होती. २०२१ च्या बाधित शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने १३५ रुपये प्रतिगुंठा भरपाई दिली, असा दुजाभाव का केला हेही मुश्रीफ यांनी सांगावे, असेही श्री. काटे यांनी पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75820 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..