
द्रष्ट्या नेतृत्वामुळे नवभारताची उभारणी
द्रष्ट्या नेतृत्वामुळे नवभारताची उभारणी
डॉ. जे. एफ. पटेल; समाजवादी प्रबोधिनीमध्ये अभ्यासवर्ग
इचलकरंजी, ता. २५ : ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध भारतीय जनतेने नव्वद वर्षे असीम त्याग करत व धैर्य दाखवत जो संघर्ष केला त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. नवभारताची उभारणी करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली केला गेला. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताची जी बलस्थाने दिसत आहेत त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील द्रष्ट्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे, असे मत जेष्ठ अर्थतज्ज्ञ व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या विविध शाखांतील प्रमुख कार्यकर्त्यांतर्फे अभ्यासवर्गात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते. स्वागत व प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
श्री. पारेकर म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने तयार झालेले भारतीय संविधान बहुमताने नव्हे, तर एकमताने मंजूर होण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान फार महत्त्वाचे आहे. आज संविधानाच्या ढाच्यामध्ये हुकूमशाहीची प्रस्थापना करण्याचा घातक प्रयत्न होत आहे.’ जयकुमार कोले, शशांक बावचकर, प्रा. शिवाजी होडगे, बी. एस. खामकर, के. एस. दानवाडे, प्रा. रमेश लवटे आदींनी मनोगते व्यक्त केली. अन्वर पटेल, साताप्पा कांबळे, सौदामिनी कुलकर्णी, मनोहर जोशी, महालिंग कोळेकर, आनंदा हावळ आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80628 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..