
सर्वोच्च न्यायालयात याचिका
प्रभाग रचनेचा वाद
आता सर्वोच्च न्यायालयात
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेबाबत जवळपास १८ याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. दरम्यान, २० जुलैला सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण देण्यास मान्यता दिली. हा निकाल देतानाच राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना केल्या. तसेच राज्यातील निवडणूक कार्यक्रमात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असेही निर्देश दिले. त्यामुळे आज प्रभाग रचनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या वरील आदेशाचा आधार घेऊन, हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच या याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असा आदेश देऊन सर्व याचिका निकाली काढल्या. या दाखल झालेल्या १८ याचिकांपैकी ५ याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80774 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..