
क्षयरोग प्रेस
‘सामाजिक सहाय्य योजने’तून
क्षयरुग्णांना मदत कराः चव्हाण
कोल्हापूर, ता. २९ः क्षयरुग्णांना ‘सामाजिक सहाय्य योजने’तून मदत करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेतून केले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत २०२५ पर्यत ‘क्षयरोग मुक्त भारत’ हे उद्दिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम राबवत आहे. उद्दिष्ट साध्य करणाच्या दृष्टीने समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती सोबत समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहायता म्हणून वरिल बाबीसाठी सहभाग नोंदवावा, तसेच https://tbcindia.gov.in/ या निक्षय पोर्टलवर स्वतःचे, संस्थाचे रजिस्ट्रेशन करावे किंवा जिल्हा क्षयरोग केंद्र येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री. चव्हाण आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82194 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..