शेकापचा इशारा

शेकापचा इशारा

शहर पाणीप्रश्‍नावर
संवादाने मार्ग काढावा

शेतकरी कामगार पक्षाची मागणी

कोल्हापूर, ता. २० ः महापालिकेची सत्ता भोगणाऱ्या प्रतिनिधींनी पाणी प्रश्नावर जनतेची दिशाभूल करू नये. शहराच्या पाणी प्रश्नावर तज्ज्ञ मंडळी, प्रशासनाने संवादाने मार्ग काढावा. अन्यथा शेतकरी कामगार पक्ष लोकशाही मार्गाने आवाज उठवेल, असा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हटले आहे, राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेने शहरवासीयांना पाण्याची कमतरता कधीच पडली नाही. त्यांचे नियोजन पिढ्यान्‌पिढ्या उपयोगी पडेल असेच आहे. पण, पंचगंगा नदी उशाला असूनही जनतेच्या घशाला कोरड पाडणारे कोण? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ४० वर्षांत ज्या विविध पक्षांनी महापालिकेची सत्ता भोगली. त्यांचेच प्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत. सत्ता असताना राजकीय इच्छाशक्ती दाखवली असती तर पाणी प्रश्न कायमचा सुटला असता. प्रशासनावर वचक नसल्याने पक्षाची सत्ता असूनही प्रशासनाला निवेदन देणे, अधिकाऱ्यांना जाब विचारणे, अधिकाऱ्यांना धारेवर धरणे, घेराओ घालणे, ठिय्या मारणे अशा उद्योगात धन्यता मानली जात आहे. तत्परतेने ईडीची चौकशी लावणारे सत्ताधारीही पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढत नाहीत. शहराचा पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना व्हावी यासाठी शेकाप आग्रही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com