उद्योग-व्यवसायाला अध्यात्माची जोड देत समाज घडवा

उद्योग-व्यवसायाला अध्यात्माची जोड देत समाज घडवा

79586

उद्योग-व्यवसायाला आध्यात्माची जोड द्या
---
श्री श्री रविशंकर; कोल्हापुरातील उद्योजक-व्यापाऱ्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः अनेकांच्या हातांना काम देणारे व्यापारी, उद्योजक हे समाजव्यवस्थेचा एक मुख्य घटक आहे. समाजाच्या निर्मिती, प्रगतीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. उद्योग-व्यवसायात अनेक आव्हाने येतात. त्यांचा सामना संयम आणि भक्कम मानसिकतेच्या जोरावर करा. उद्योग-व्यवसायाला आध्यात्माची जोड देत समाज घडविण्यासाठी योगदान द्या, असे आवाहन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आज येथे केले.
येथील अयोध्या पार्कच्या सोसायटी हॉलमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, स्मॅक, गोशिमा, मॅक या औद्योगिक संघटनांतर्फे आयोजित ‘उद्योजक-व्यापारी संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री श्री रविशंकर म्हणाले, की जीवनात संतोष निर्माण करणे हा आध्यात्मिक ज्ञानाचा उद्देश आहे. जीवन जगण्यासाठी युक्ती, शक्ती, भक्ती, मुक्ती आवश्‍यक आहे. केवळ पैशांतून शक्ती आणि पुस्तक वाचून युक्ती (ज्ञान) मिळत नाही. त्यामुळे योग, साधना, सत्संग या त्रिसूत्रीने समाधानी आयुष्य जगा आणि इतरांना सुख द्या. बारा वर्षांनी महालक्ष्मीच्या कोल्हापूरनगरीत आल्याचा आनंद आहे. महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि उद्योजक-व्यावसायिकांच्या कामगिरीने कोल्हापूर दरडोई उत्पन्नात पुन्हा देशात आघाडी घेईल.
आमदार जयश्री जाधव, ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते श्री श्री रविशंकर यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक हर्षद दलाल, दीपक पाटील, मोहन कुशिरे, दीपक चोरगे, दिनेश बुधले, सचिन मेनन, नितीन वाडीकर, सुनील कुलकर्णी, चेतन नरके, धैर्यशील पाटील, राजू पाटील, अतुल पाटील, मिलिंद धोंड, जयेश ओसवाल उपस्थित होते. सीमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक सुरेंद्र जैन यांनी आभार मानले.

चौकट
कर्मचाऱ्यांचे मन प्रसन्न ठेवा...
समाजात नैराश्‍य वाढत आहे. अशा स्थितीत ईश्‍वरकृपा आणि आत्मविश्‍वासासाठी ध्यानधारणा महत्त्वाची आहे. चिंता, काळजीतून काही नवनिर्मिती होत नाही. त्यामुळे स्वतःसह कर्मचाऱ्यांचे मन प्रसन्न ठेवण्यावर भर द्या. कर्मचाऱ्यांना प्रोत्‍साहन द्या. त्यांचा उत्साह वाढवा, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले.

श्री श्री रविशंकर यांची सिद्धगिरी मठास भेट
कोल्हापूर, ता. ३१ ः कणेरी मठावर होणारा सुमंगलम महापंचभूत महोत्सव ज्ञान, विज्ञान आणि आध्यात्माचा अनोखा मिलाफ असून, त्यातून साऱ्या जगाला दिशा मिळणार आहे. त्यासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजी व त्यांच्या अनुयायांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‍गार आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी काढले. सिद्धगिरी मठ येथे त्यांनी आज भेट देऊन महोत्सवाच्या तयारीची पाहणी केली आणि उपस्थितांशी संवाद साधला.
कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुमंगलम महापंचभूत महोत्सव होईल‌. त्याची जोरदार तयारी सध्या मठावर सुरू आहे. याबाबतची माहिती श्री श्री रविशंकर यांना मिळाल्यावर त्यांनी आज महोत्सवस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी त्यांना महोत्सवाविषयीची माहिती दिली. जगभरातून किती लोक येणार, त्यांची व्यवस्था आणि एकूणच महोत्सवाच्या वैशिष्‍ट्यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. मठावरील विविध ठिकाणी श्री श्री रविशंकर यांनी भेटी देऊन तेथे साकारत असलेल्या प्रकल्पांचीही माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com