शिवाजी महाराज जयंती लेख

शिवाजी महाराज जयंती लेख

समतेचेही बीजारोपण
चारशे वर्षांपूर्वी शिवरायांनी रयतेला हा विश्‍वास दिला, की हे राज्य राजाचे नाही, तर रयतेचे आहे. म्हणजे स्वातंत्र्याचे मोल आणि ‘हे राज्य माझे आहे’ ही भावना जनतेच्या मनात जागविणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. अनेक समूहांना धर्माने नाकारले होते. अशा दलित, आदिवासी समूहांना सोबत घेऊन किल्लेदार केले, तर देशातील पहिले आरमार उभारले. याचाच अर्थ समतेचे बीजारोपण देशात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी केले. निजामशाही, आदिलशाही याचबरोबर इंग्रज, डच, पोर्तुगीज अशा शत्रूंबरोबर तर काही आप्तस्वकियांबरोबर लढण्यात शिवरायांनी आपले युद्धकौशल्य विकसित केले. इतक्‍या लोकांबरोबर लढूनही शिवरायांनी वैरभाव जोपासलेला नाही किंवा याला धार्मिक युद्ध असं कोणीही म्हणत नाही. हे राजसत्तेचं युद्ध होतं. म्हणूनच औरंगजेबाजाचा इतिहासकार शिवाजी महाराजांचा उल्लेख गौरवानेच करतो.
-----------------
तत्त्वांचा अनोखा मिलाफ
शिवाजी महाराजांनंतर २०० वर्षांनी फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन महान संकल्पना जगाला दिल्या. आज जगातील सर्व लोकशाहीवादी देश या तीन तत्त्वांचा स्वीकार करून आधुनिक जग उभारत आहेत. शिवरायांनी या तीन तत्त्वांचा अनोखा मिलाफ आपल्या स्वराज्यात केल्याचे दिसते. यावरच महाराजांचे द्रष्टेपण, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेले प्रेमही सिद्ध होते. यामुळेच सामान्य जनतेच्या मनात शिवरायांबद्दल असलेले प्रेम इतके उदात्त आणि विशाल होते, की ४०० वर्षांनंतर हा अंतर्गत जिव्हाळ्याचा खळखळता प्रवाह आजही तितकाच जिवंत आणि उदात्त आहे. इतके प्रेम आणि आदर जगाच्या इतिहासात कुठल्याही राजांचा किंवा सम्राटांच्या वाट्याला क्वचितच आला आहे. या प्रकारे शिवरायांचा इतिहास समजून घेतला, तर शिवाजी महाराजांच्या या लोकप्रियतेचे रहस्य आपल्या लक्षात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com