कुत्र्यांच्या दहशतीखाली वस्त्रनगरी

कुत्र्यांच्या दहशतीखाली वस्त्रनगरी

कोट देत आहे
----------------

कुत्र्यांच्या दहशतीखाली वस्त्रनगरी
---
वारंवार हल्याच्या घटना; रोज पाच ते सात नागरिकांचा चावा
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ : शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेस जीव गमवावा लागला. या घटनेस वृद्धा, कुत्री की महापालिका प्रशासन कोण जबाबदार आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. मुले, महिला, वृद्ध तसेच मॉर्निंग वॉक करणारे नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी अनेक तक्रारी, आंदोलने, निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासन केवळ मोहिमेच्या नावाखाली हलगर्जी करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे तरी महापालिका प्रशासनास जाग येणार का, हे मात्र अनुत्तरित आहे.
शहरात सुमारे पाच हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. ती घोळक्याने फिरत असल्याने बहुतांश भागात त्यांची दहशत पाहावयास मिळते. त्यांच्या हल्ल्यात वाढ होत असून, यात अधिकतर महिला व शाळकरी मुलांचा समावेश आहे. पहाटे फिरावयास जाणाऱ्या नागरिकांनी कुत्र्यांची धास्ती घेतली असून, अनेकांनी मॉर्निंग वॉक बंद केले आहे. अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला होणे ही बाब अत्यंत गंभीर बनली. शहरात रोज पाच ते सात नागरिकांचा भटक्या कुत्र्यांकडून चावा घेतल्याच्या नोंदी होतात.
शहरातील विविध संघटना, राजकीय पक्ष आंदोलने, निवेदन देऊन महापालिका प्रशासनास कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही. त्यावर निर्बीजीकरण पर्याय असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे आणखी किती हल्ले सहन करायचे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. निर्बीजीकरण व लसीकरण मोहिमेनंतर भटक्या कुत्र्यांचा हिंस्त्रपणा कमी होत असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, यापूर्वीही तत्कालीन पालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरण मोहीम राबवली होती. मात्र, ही मोहीम केवळ आर्थिक उधळण ठरली. पुन्हा निर्बीजीकरण मोहीम सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मोहीम कितपत यशस्वी होईल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे नागरिकांकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी होते.
---------
अपघात होण्याचे प्रमाण वाढले
रात्री निर्जन रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचीच दहशत असते. अशा वेळी एखादा दुचाकीस्वार आल्यास टोळीने भटकी कुत्री पाठलाग करतात. त्या वेळी भीतीने दुचाकीवरून नियंत्रण सुटून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या सत्रात काम करणारे नागरिक तणावाखाली असतात.
----------
‘आयजीएम’मधील कुत्र्यांचा चावा घेतलेल्या रुग्णांच्या नोंदी
(ग्राफ करणे)
महिना * संख्या
सप्टेंबर २०२२ * ३९९
ऑक्टोबर २०२२ * ३५४
नोव्हेंबर २०२२ * ४२४
डिसेंबर २०२२ * ३६६
जानेवारी २०२३ * ३९८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com