शेतीपंप वीज जोडण्या

शेतीपंप वीज जोडण्या

प्रलंबित२०४४ वीज जोडण्यांचे
काम मार्चअखेरः अरविंद भादीकर
कोल्हापूर, ता. २८ : महावितरणतर्फे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रलंबित २०४४ वीज जोडण्यांचे काम ३१ मार्च २०२३ अखेर करण्यात येणार आहेत. तशी सूचना कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांनी केली आहे. त्यासाठी कृषी आकस्मिक निधीसह राज्य पातळीवर पंधराशे कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महावितरणने शेती पंपांच्या वीज जोडण्यांचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी अग्रक्रम दिला आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४ हजार ८८७ शेती पंप ग्राहकांनी पाच वर्षांहून अधिक काळ एकही वीज बिल भरलेले नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे. या थकबाकीचा आकडा ७५ कोटी रूपये इतका आहे. या स्थितीत शेती पंपांच्या वीज जोडण्यांचा प्रश्‍न चर्चेत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रलंबित वीज जोडण्यांचा प्रश्‍न लवकर निकाली लागावा, यासाठी संघटना पाठपुरावा करत आहेत. त्यातच वीज मीटरची दुरूस्ती न झाल्याने बिल का पाठवले जाते, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. प्रलंबित वीज जोडण्या तत्काळ करा, अशी मागणीही केली जात आहे.
दरम्यान, शेती पंपांना दिवसा वीज मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३८५ मेगावॅटचा शेतीचा वीज वापर सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे कार्यान्वित करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून गतीने पूर्ण करावी, असेही भादीकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com