
जैन सांप्रदायाने मराठी साहित्य समृद्ध केले
जैन संप्रदायाने मराठी साहित्य
समृद्ध केले ःगोमटेश्वर पाटील
कोल्हापूर ः ‘जैन संप्रदायाने मराठी साहित्य समृद्ध केले आणि मराठी साहित्यात मोलाची भर घातली’, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित श्री. रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. डॉ.पाटील म्हणाले, ‘दोन हजार वर्षात शेकडो काव्यप्रकार जैन साहित्याने निर्माण केले. दक्षिणेतील, उत्तरेतील अनेक काव्यप्रकार मराठीत जैन कवींनी आणले. मराठी भाषेविषयीचे प्रेम जैन कवींनी आपल्या काव्यातून प्रकट केले आहे.’ कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, ‘जैन साहित्य हे वैविध्यपूर्ण असताना देखील सर्वदूर का पोहोचले नाही, याचा विचार करायला हवा. ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’ या कार्यक्रमास आर. बी. पाटील, प्रदीप पाटील, प्रमोद दोशी, दीपक भादले, जयवंत दळवी, आदी उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले.