राजाराम बातमी

राजाराम बातमी

‘राजाराम’ची संपूर्ण एफआरपी
जमा : महादेवराव महाडिक
चार लाख १८ हजार टन गाळप
कोल्हापूर, ता. १४ : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्यामार्फत या वर्षी गाळप झालेल्या उसाची सर्व बिले संबंधितांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली.
कारखान्यात आम्ही नेहमीच सभासद व ऊस पुरवठादारांच्या हितास प्राधान्य दिले आहे. या वर्षीच्या हंगामाता आतापर्यंत १५ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाची बिले यापूर्वीच आदा करण्यात आली होती. आतापर्यंत १२१ कोटी ३१ लाखांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर जमा केली आहेत. तसेच या वर्षीचा हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांना आपण धन्यवाद देत असल्याचे महाडिक या वेळी म्हणाले.
कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झाला. हंगामाच्या १२६ दिवसांच्या कालावधीत कारखान्यात चार लाख १८ हजार ३०६ टन उसाचे गाळप होऊन ११.९५ साखर उताऱ्याने पाच लाख १२० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या वर्षीच्या हंगामात १५ जानेवारी २०२३ पर्यंत गाळप झालेल्या दोन लाख ९३ हजार १३१ मेट्रीक टन उसाची निव्वळ देय एफ.आर.पी. प्रतिटन २९०० रुपयांप्रमाणे होणाऱ्या ऊस बिलाची ८५ कोटी एक लाखाची रक्कम यापूर्वीच अदा केली आहे. १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी अखेर गळीत झालेल्या एक लाख २५ हजार १७५ टन उसाची प्रतिटन २९०० रुपयांप्रमाणे एफआरपीची ३६ कोटी ३० लाखांची रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहे. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष दिलीप भ. पाटील, उपाध्यक्ष वसंत बा. बेनाडे, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक प्रकाश ज. चिटणीस उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com