राजाराम निवडणूक

राजाराम निवडणूक

अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
‘राजाराम’चा आखाडा; विरोधकांचे आज शक्तिप्रदर्शनाने अर्ज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (ता. २७) अखेरचा दिवस आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीचा पहिला टप्पा उद्या पूर्ण होत आहे.
दरम्यान, विरोधी आमदार पाटील यांच्या नेतृत्‍वाखालील गटाचे अर्ज उद्याच (ता. २७) शक्तिप्रदर्शनाने भरण्यात येणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांना सकाळी दहा वाजता सासने मैदानावर बोलवले आहे. स्वतः आमदार पाटील या वेळी उपस्थित रहाणार आहेत.
या निवडणुकीसाठी २३ एप्रिलला मतदान होत आहे. २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. आतापर्यंत कारखान्याच्या पाच गटांसह राखीव गटात मिळून १०१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत; तर ३८७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (ता. २९) होणार आहे. सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस पुरवठा, शेअर्सच्या रकमेची पूर्तता, विकास सोसायटींची थकबाकी नसणारे उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे छाननी दिवशी यंत्रणेबरोबरच उमेदवारांचाही कस लागणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक निळंकठ करे तर सहायक म्हणून प्रदीप मालगांवे काम पहात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com