बाजार समितीसाठी ४० अर्जांची विक्री

बाजार समितीसाठी ४० अर्जांची विक्री

बाजार समितीसाठी
४० अर्जांची विक्री
जयसिंगपूर ः जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी तब्बल ४० अर्जांची विक्री झाली असली तरी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. सुट्याव्यतिरीक्त आता केवळ दोनच दिवस बाकी असल्याने निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. बाजार समितीच्या निवडणूकप्रश्नी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीकडे लक्ष लागले आहे. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक स्थिती बेताची आहे. बाजार समितीची निवडणूक जाहिर झाल्यापासून बिनविरोध व्हावी अशी मागणी होत आहे. २८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून ४० अर्ज विक्री होऊनही अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज नेणाऱ्या काहींचे बिनविरोधसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांनी मनधरणी केल्याची केल्याचेही समजते. बिनविरोधसाठी सर्वच नेते आणि पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दोन दिवसांत जागा वाटपावर चर्चा होऊन बिनविरोधवर शिक्कामोर्तब होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com