विद्यापीठाच्या ४९ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पोस्टाने पदवी

विद्यापीठाच्या ४९ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पोस्टाने पदवी

विद्यापीठाच्या ४९ हजार विद्यार्थ्यांना
मिळणार पोस्टाने पदवी प्रमाणपत्र

कोल्हापूर, ता. ३१ : शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षान्त समारंभातील पोस्टाद्वारे पाठवावयाची ४९ हजार ८६३ इतकी पदवी प्रमाणपत्रे पाठविण्याची संपूर्ण कार्यवाही शुक्रवारी (ता. ३०) एका दिवसात परीक्षा विभागाने पूर्ण केली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
दीक्षान्त समारंभ केंद्रीय पद्धतीने बुधवारी (ता. २९) सकाळी राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात झाला. या समारंभामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी एकूण ६६ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी समक्ष पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी अर्ज केले होते, तर ४९ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी पोष्टाद्वारे पदवी प्रमाणपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार ४९ हजार ८६३ विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात आली. दीक्षान्त समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहून ९ हजार २८७ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रे स्वीकारली आहेत. तर उर्वरित ७,३०७ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रे दीक्षान्त समांरभादिवशी स्वीकारलेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांना येत्या दहा दिवसांमध्ये ही पदवी प्रमाणपत्रे स्वीकारण्याबाबत कळविण्यात येईल. त्यानंतरही जी पदवी प्रमाणपत्रे स्वीकारली गेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांना १० दिवसानंतर पोष्टाद्वारे पदवी प्रमाणपत्रे त्यांच पत्यावर पाठविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com