कनवा पुस्तक प्रकाशन

कनवा पुस्तक प्रकाशन

98147
कोल्हापूर ः स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी स्वामी अगोचरानंदजी, स्वामी सेवानंदजी, डॉ. रमेश जाधव, राहुल माळी, अमेय जोशी आदी.

‘स्वामी विवेकानंद आणि करवीर’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर, ता. २३ ः ‘‘सद्संग व सत्संग यातील अंतर जाणण्यासाठी ‘स्वामी विवेकानंद आणि करवीर संस्थान’ उपयुक्त ठरेल. त्यातून सव्वाशे वर्षापूर्वीच्या कोल्हापूर संस्थानचे दर्शन घडते,’’ असे प्रतिपादन स्वामी अगोचरानंदजी यांनी केले.
कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार राहुल माळी यांच्या ‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी करवीरनगर वाचन मंदिर येथे झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव होते.
स्वामी अगोचरानंदजी म्हणाले, ‘‘विवेकानंदांनी परिव्राजक काळात कोल्हापूर संस्थानला भेट दिली होती. त्या कालावधीत झालेल्या सत्संगाबाबत मांडलेल्या पुराव्यातून त्यावेळच्या कोल्हापूरचे दर्शन घडते. विवेकानंदांचा पदस्पर्श ज्या वास्तूंना झाला, त्या जपण्याची गरज आहे.’’
डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘‘या पुस्तकातून विवेकानंदांच्या येथील वास्तव्यावर प्रकाश टाकला आहे. माणुसकी हाच धर्म, सत्य हाच धर्म ही त्यांची भूमिका होती. १८९२-९३ च्या काळातील कोल्हापूर समजायला मदत होते.’’
यावेळी स्वामी सेवानंदजी यांनी विवेकानंद यांनी जी शरणागतता दाखवली होती, ती प्रत्येकाने अंगी बाणवावी असे सांगितले. राहुल माळी यांनी प्रास्ताविक केले. अमेय जोशी यांनी स्वागत केले. सुधीर मेतके, भारत म्हातगुडे यांनी सूत्रसंचालन केले. संजय शेलार यांनी आभार मानले. यावेळी शरद माळी, राम माळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com