पाणीपुरवठा अद्याप 
पूर्वपदावर नाहीच

पाणीपुरवठा अद्याप पूर्वपदावर नाहीच

पाणीपुरवठा अद्याप
पूर्वपदावर नाहीच
३९ ठिकाणी टॅंकरमधून पुरवठा; कळंबा तलावाच्या वाहिनीचे काम पूर्ण
कोल्हापूर, ता. २५ ः पाणी उपसा पूर्ण क्षमतेने सुरू झाला असला तरी आजही शहरातील पाणीपुरवठा पूर्वपदावर आला नाही. काही भागांत कमी दाबाने पाणी आल्याने दिवसभरात ३९ ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. दरम्यान, कळंबा तलावातून फिल्टर हाऊसकडे आणल्या जाणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या चेंबरची तसेच वाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली. त्यामुळे बुधवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.
बालिंगा व शिंगणापूर उपसा केंद्रातून सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू झाला, पण त्यातून रात्रीत टाकी भरल्या नाहीत. तसेच कळंबा तलावातीलही पाणी थांबल्याने मंगळवारी पहाटेपासून मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम झाला. अनेक भागांत कमी दाबाने पाणी आल्याने नागरिकांना तळमजल्यावरील टाकीही भरता आल्या नाहीत. त्यासाठी महापालिकेकडे संपर्क साधून टॅंकर मिळवण्यासाठी धडपड करावी लागली. मध्यवस्तीत अनेक भागांत नागरिक भर उन्हात टॅंकरचे पाणी भरताना दिसत होते. दिवसभरात ३९ ठिकाणी महापालिकेचे तसेच भाड्याने घेतलेल्या टॅंकरमधून पाणीपुरवठा करण्यात आला.
कळंबा तलावातून दररोज एक एमएलडीपेक्षा जास्त पाणी घेतले जाते. त्यातून संभाजीनगर, पाण्याचा खजिना, वारे वसाहत आदी परिसरात पुरवठा केला जातो. चेंबर व वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने उद्यापासून हे पाणीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिंगणापूर योजनेच्या पाण्यावरील ताण थोडा कमी होईल, असे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com