गड-सीईटी परीक्षा

गड-सीईटी परीक्षा

एकच पेपर, एकाचवेळी परीक्षा हवी
एमएचटी-सीईटी, जेईईचा प्रश्न; विद्यार्थ्यांत अन्यायाची भावना

अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ५ : परीक्षेचे वेगवेगळे पेपर. सहाजिकच काठिण्यपातळीही वेगवेगळी. त्यात प्रत्येक पेपरच्या टॉपर आणि लोअरनुसार ठरणारे वेगवेगळे पर्सेंटाईल यामुळे एमएचटी-सीईटी व जेईईच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यामुळे एकच पेपर व एकाचवेळी परीक्षा घ्यावी, अशी मागणी होत आहे. नीटचा एकच पेपर आणि एकाचवेळी परीक्षा होऊ शकते; मग एमएचटी-सीईटी व जेईईला का शक्य नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.
इंजिनिअरिंग, फार्मसी, अॅग्रीकल्चर प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा अनिवार्य आहे. या गुणांवरच प्रवेश निश्चित होतो. आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी जेईई मेन्स व जेईई अॅडव्हान्स परीक्षा महत्त्वपूर्ण ठरते. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतात. दर दिवशी दोन शिफ्टमध्ये वीस पेपर होतात. ज्या-त्या दिवशीच्या पेपरचा टॉपर आणि लोअर यांच्या गुणावर पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल ठरते.
मात्र, परीक्षांचे वीस वेगवेगळे पेपर असल्याने काठिण्यपातळी प्रत्येक पेपरनुसार वेगवेगळी राहते. शिवाय एका पेपरच्या टॉपरचे गुण कमी असतील तर त्या पेपरच्या अन्य विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल चांगले राहतात. दुसरा पेपर देणाऱ्या टॉपरचे गुण अधिक असतील तर त्या पेपरच्या अन्य विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल कमी होतात. परीक्षा २० दिवस चालते. त्यामुळे शेवटच्या दिवशी पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याला आधीचे सर्व पेपर पाहता येतात. साहजिकच पेपर देताना त्याला फायदा होतो. तसेच अभ्यासासाठी अधिकचे १९ दिवस मिळतात. त्यादृष्टीने पहिल्या दिवशी पेपर देणाऱ्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

चौकट...
* परीक्षा केंद्रांच्या कमतरतेमुळे...?
एमएचटी-सीईटी आणि जेईई परीक्षा ऑनलाईन होतात. त्यासाठी सुसज्ज संगणक केंद्राची गरज असते. एकाच वेळी परीक्षा घ्यायची झाल्यास विद्यार्थ्यांच्या प्रमाणात संगणक केंद्र असणे आवश्यक आहे. गरजेइतकी संगणक केंद्रे उपलब्ध होत नसल्याने २० दिवस परीक्षेचे नियोजन केले जात असल्याचे समजते. मात्र, परीक्षेसाठी पायाभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांवर अन्याय करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

कोट...
परीक्षेचे पेपर वेगवेगळे असल्याने काठिण्यपातळी वेगवेगळी राहते. शिवाय पेपरनुसार पर्सेंटाईलमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करावा. नीटच्या धर्तीवर एकाचवेळी परीक्षा व्हावी.
- बाळासाहेब वालीकर
पालक, गडहिंग्लज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com