हिरण्यकेशी नदीवर आजपासून उपसाबंदी

हिरण्यकेशी नदीवर आजपासून उपसाबंदी

हिरण्यकेशी नदीवर
आजपासून उपसाबंदी
गडहिंग्लज : चित्री प्रकल्पातून उद्यापासून (ता. १९) शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्याची टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता आवर्तनाचे पाणी वेळेत नांगनूर बंधाऱ्‍यापर्यंत पोहोचण्यासाठी १९ ते २४ मे अखेर असे सहा दिवस हिरण्यकेशी नदीच्या दोन्ही तीरावरील कृषी पंपासाठी उपसाबंदी राहणार आहे. नदीवरील ऐनापूर, गजरगाव, हरळी, गिजवणे, जरळी, निलजी, खणदाळ या बंधाऱ्‍यावर ही उपसाबंदी राहणार आहे. भादवणच्या वरील बाजूला उपसाबंदी लागू नाही. यंदा मॉन्सून लांबणीवर असल्याचे हवामान खत्याने सांगितले आहे. त्यातच प्रकल्पातील साठाही कमी झाला आहे. शेतीसाठी हे शेवटचे आवर्तन असणार आहे. यामुळे खणदाळ व नांगनूर बंधाऱ्‍यापर्यंत पिण्यासाठी पाणी देणार असल्याने ते वेळेत पोहोचण्यासाठी ही उपसाबंदी आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. उपसाबंदी काटेकोर राबवण्यात येणार असून अनाधिकृत उपसा करणाऱ्‍यांचा विद्युत पंप जप्त करण्यासह पाणी परवाना एक वर्षासाठी रद्द करण्याचा इशाराही दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com