गायरानातील अतिक्रमणधारकांना

गायरानातील अतिक्रमणधारकांना

गायरानातील अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा

आमदार हसन मुश्रीफ : प्रशासनाने अतिक्रमणे काढू नयेत

कोल्हापूर, ता. २८: गायरानामध्ये अतिक्रमणे केलेल्या नागरिकांच्या अतिक्रमित जागांचे नियमितीकरण करून अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणे न काढण्याच्या सूचना प्रशासनाला तातडीने द्याव्यात, असेही मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे, गायरानामध्ये अतिक्रमण केलेल्या नागरिकांना राज्य शासनाने तत्काळ नियमितीकरण केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे काही दिवसांपूर्वी अशाच गायरानामध्ये अतिक्रमण केलेल्या लोकांना शासनाने नोटीसा दिल्या होत्या. त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीमार्फत कोल्हापुरात मोर्चा काढला होता. त्यावेळेला राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे आम्ही सांगितले होते. जिथे -जिथे गायरानमध्ये अतिक्रमण केलेली आहेत. त्या अतिक्रमण केलेल्या नागरिकांचे नियमितीकरण करून यापुढील काळात अतिक्रमण होणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापही तसे होताना दिसत नाही. अतिक्रमण नोटीस आलेल्या नागरिकांनी या नोटीसला रितसर आपण त्या ठिकाणी कधीपासून रहिवास करतो, तसेच अनुषंगिक संपूर्ण माहिती द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com