भाईचारा चाहिए...!

भाईचारा चाहिए...!

‘उद्या पुन्हा एकत्रित
गुण्यागोविंदाने राहायचे आहे...’
कोल्हापूर, ता. ७ : ठिकाण अकबर मोहल्ला... वातावरण तणावग्रस्त... सर्वत्र दगडफेक सुरू होती... अनेक महिला ती दंगल पाहत उभ्या होत्या. त्या सुन्न झाल्या होत्या. तो प्रकार पाहून एक महिला तर सर्वांना उद्देशून म्हणाली, ‘आज दंगल करीत आहेत; पण उद्या आपल्या या गावात पुन्हा एकत्रित गुण्यागोविंदाने राहायचे आहे. आक्षेपार्ह स्टेटस‌ ज्या मुलाने ठेवले, त्या मुलाला शिक्षा द्या. अखंड समाजाला दोष का देता?’.
‘आज आपण भांडू, पण उद्या आपल्याला एकत्रित यायचे. कोल्हापूर हे आपलं सर्वांचं गाव आहे. पोलिसांनी हा प्रकार तातडीने थांबवायला हवा. पोलिसांची जास्त फौज इथे द्यावी. पोलिस कमी दिसताहेत. दगड टाकून, गाड्या विस्कटून कुणाला काय मिळणार आहे? घराचे, दुकानांचे, टपरी, ढकलगाड्यांचे झालेले नुकसान कोण भरून देणार? अशी आर्जवे महिलांकडून सुरू होती. पण, या तंग वातावरणात महिलांचे हे आवाज कुणापर्यंतही पोचत नव्हते.
दुपारी तर उन्हाची खाई पेटली होती. त्यात दंगल पेटलेली. ‘कोल्हापूरमध्ये हा प्रकार आम्हाला तरी माहिती नव्हता. हे कुणी केले?’, असे प्रश्‍न प्रत्येक जण विचारत होता. हे व्हायला नको पाहिजे. वातावरण दूषित कुणी केले, त्याचा शोध घ्या, असे प्रत्येक जण एकमेकांना सांगत होते. अशा अवस्थेत अकबर मोहल्ल्यातील मुस्लिम बांधवांनी घर उघडून कुणाला दगड लागू नये, म्हणून आसरा दिला. दुपारपर्यंत जसे वातावरण निवळत गेले, तसे प्रत्येक जण बाहेर पडून आपापल्या मार्गाने निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com