स्वाभिमानीचे पहिले नांगरट साहित्य संमेलन

स्वाभिमानीचे पहिले नांगरट साहित्य संमेलन

‘स्वाभिमानी’चे पहिले नांगरट साहित्य संमेलन

४ जूनला कोल्हापुरात आयोजन; ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ अध्यक्ष


कोल्हापूर, ता.१५: शेतकऱ्यांच्या जीवनातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणावे, यासाठी पहिल्या नांगरट शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वामी विवेकानंद कॉलेज येथे ४ जूनला ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

श्री. शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हे नांगरट साहित्य संमेलन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतले जाणार आहे. या संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत. या एक दिवशीय साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी, या चर्चेच्या माध्यमातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी, यासाठीच त्याचे आयोजन केले आहे.
हे संमेलन तीन सत्रात होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रामध्ये संमेलनाचे उद्घाटक रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष राजू शेट्टी , निमंत्रक कवी संदीप जगताप व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ हे मनोगत व्यक्त करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये ‘शेतकरी प्रश्नांचे साहित्य, कला ,माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब’ या विषयावरचा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात पत्रकार निखिल वागळे ,इंद्रजित देशमुख ,चित्रपट निर्माते प्रवीण तरडे सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कवी संमेलन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com